Drip Irrigation Scheme : राज्यात साधारण 82 टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे या कोरडवाहू क्षेत्रावरील शेतीसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेत असते. राज्य सरकार सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देते. जेणेकरून शेतकऱ्यांचं शेतात सिंचनची सोय उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास प्रति थेंब अधिक पीक योजने अंतर्गत राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते.
हे वाचा : नुकसान भरपाईसाठी मिळाले 9 कोटी
राज्यातील कोरडवाहू जमीन जास्तीत जास्त पिकांखाली आणण्याचं सरकार धोरण आहे. त्यासाठी सिंचनाची गरज असते. त्यामुळे उपलब्ध पाणी आणि त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना करता यावा, असा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे ठिंबक सिंचनचा वापर करून पाण्याची बचत तर होतेच पण पिकांना गरजेपुरते पाणी देऊन पाण्याचा योग्य प्रमाणात वापरही करता येतो.
Drip Irrigation Scheme

अर्ज कुठे करायचा ?
इथे पहा
पात्र लाभार्थी
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन ठिंबक सिंचन योजनेसाठी राज्यातील सर्वच शेतकरी पात्र आहेत. परंतु अर्जदार शेतकऱ्याने मागील 7 वर्ष या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अशी अट राज्य सरकारने घातलेली आहे.
कागद पत्र
- ठिंबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे जमिनीचा सातबारा आणि ८अ उतारा असणे आवश्यक आहे. अनूसूचित जाती आणि अनूसूचित जमातीच्या लाभार्थींना योजनेचा लाभ घेण्यासाठी संवर्ग प्रमाणपत्र अनिवार्य आहे.