महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive ) प्रोत्साहनपर लाभ योजनेतील (Farmer Incentive Scheme) पहिल्या यादीत 12 हजार 942 पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. यातील १२ हजार ८८० शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला आहे. मात्र उर्वरित ६२ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification) केलेले नाही.
हे वाचा :
त्यामुळे पहिली यादी १०० टक्के लाभ मिळण्यापासून वंचित राहिली आहे. दुसरी यादी अद्याप जाहीर न झाल्याने लाभासाठी अर्ज दाखल केलेले 10 हजार शेतकरी आनुदानच्या प्रतीक्षेत आहेत.शेती व शेतीशी निगडित कामांसाठी शेतकरी व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून पीक कर्ज घेतात. 2015 – 2016 ते 2018 – 2019 या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केली होती.
Farmer Loan Waive
राज्याच्या काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नव्हती. परिणामी, शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला होता. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली होती. पण अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती. त्यांना लाभ मिळाला नव्हता.
लाभ थेट खात्यात जमा
त्यामुळे नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने 50 हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देणारी योजना लागू केली आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ही योजना अमलात आणली असून, नियमित परतफेड केलेले कर्ज प्रोत्साहन अनुदान असलेल्या 50 हजारांपेक्षा कमी रकमेचे असल्यास त्यांनी उचल करून परतफेड केलेल्या रकमे एवढी रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचे जाहीर केले होते.