Farmers Committed Suicide : याबाबत बोलताना सुनील केंद्रेकर म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. ज्यात आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. त्यामध्ये असे निदर्शनास आले की, शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्वाचा कारण आर्थिक परिस्थितीच आहे. त्यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे
जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारत आहेत. अशा शेतकऱ्यांना संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पेरणीच्या वेळी 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले.