Vihir Anudan Yojana : शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रु अनुदान.

Vihir Anudan Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान मिळणारं आहे. त्यानुसार, राज्यात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनं सांगितलं आहे.

विहिरीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर यांची पात्रता काय आहे ? यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ? या बदलाची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Vihir Anudan Yojana

लाभधारकाची पात्रता

  • अर्जदाराकडे कमीत कमी 1 एकर शेतजमीन असावी.
  • अर्जदाराच्या सातबाऱ्यावर या आधीच विहिरीची नोंद असू नये.
  • एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा.
  • अर्जदार हा जॉब कार्डधारक असणे आवश्यक आहे.

लाभधारकाची निवड कशी होते ?

या योजनेत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, शासन निर्णयानुसार.

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • विमुक्त जाती
  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
  • विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन)

विहीरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आर्थिक मदत किती ?

महाराष्ट्र हे मोठं राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्यासाठी विहिरीचा एकच आकार आणि दर निश्चित करणं शक्य नाही.

त्यामुळे मग विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा येईल. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यानं विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करण्यात येईल. असं शासनाने स्पष्ट केलं आहे.

विहीरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment