Scheme : राज्यातील भटक्या विमुक्त जाती, जमाती या प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचाविण्यासाठी त्यांना हक्काचे घर देणारी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. निवड झालेल्या कुटुंबाला प्रत्येकी 5 गुंठे जागा देऊन त्यावर 269 चौरस फुटाचे घर बांधून दिले जाणार आहे.
हे वाचा : महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता.
भटक्या विमुक्त समाजाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली जात आहे. या समाजातील अनेक कुटुंबांना हक्काचे घर नसते. या गावातून दुसया गावात सतत त्यांची भटकंती सुरू असते. कच्चे घर, झोपडी अथवा पालामध्ये राहून त्यांचा संसार चालतो. त्यामुळे ही वसाहत योजना भटक्या समाजाकरिता लाभदायी मानली जात आहे.
Scheme
घरकुलासाठी किती पैसे मिळतात ?
लाभ कोणाला घेता येतो ?
- कुटुंबाकडे भटक्या विमुक्त जाती, जमातीचा जातीचा दाखला असावा.
- रहिवासी दाखला तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख 20 हजार रुपयांच्या आत असावे.
- कुटुंबाला स्व मालकीचे घर नसावे, त्यांनी इतरत्र कोठेही घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
घरासाठी अर्ज केलेला